Monday, 15 November 2021

बिरसा मुंडा : आदिवासी नायकाची कथा

बिरसा मुंडा : आदिवासी नायकाची कथा

अलोक पवार

आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून आता बरेच वर्ष झाले. हे स्वातंत्र्य कोण्या एकाच्या नाही तर बऱ्याच जणांच्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला प्राप्त झाले. मात्र जेंव्हा आपण या स्वातंत्रांचा विचार करतो तेंव्हा आज अजूनही काही वर्ग हे समाजापासून काही अंशी मागे असे दिसून येतात, ज्यात प्रामुख्याने आदिवासी समाज असूनही आहे दिसून येते. त्यांना शिक्षण, नोकरी यापेक्षाही व्यक्ती म्हणून किंवा निदान मूलभूत गरजा जसे की अन्न, वस्त्र आणि निवारा यांसारख्या गोष्टी देखील योग्य वेळी प्राप्त होत नाहीत. स्वातंत्र्यप्राप्ती पूर्वी या सर्व समाजला एक व्यक्तीने खूप जोरदारपणे प्रयत्न केला तो म्हणजे बिरसा मुंडा यांनी.


बिरसा मुंडा हे स्वतः मुंडा या आदिवासी समाजात जन्मलेले. १५ नोव्हेंबर १८७५ मध्ये त्यांचा जन्म झारखंड मधील, खुटी जिल्ह्यातील उलिहातू या गावात झाला. जन्माने आदिवासी असलेले बिरसा यांना इतर संप्रदायाला ज्या त्या काळी मिळणाऱ्या सुखसोई होत्या त्या अजिबातच प्राप्त झाल्या नाहीत. आणि त्यातूनही समाज पारतंत्र्यात त्यामुळे एकंदरीतच परिस्थिती अवघड होती. त्याकाळी शाळेत प्रवेश घ्यायचा तरी आदिवासी समाजातील मुलांसाठी अशा काहीच सुविधा उपलब्ध नव्हत्या. मात्र बिरसा मुंडा यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. ब्रिटिश कशा प्रकारे आपली पिळवणूक करीत आहेत याचे ज्ञान त्यांना या प्राथमिक शिक्षणातूनच येत गेली. ज्या प्रकारे मिशनरी विद्यालयात शिक्षण घेताना त्यांना आदिवासी समाज किती मागासलेला आहे हे गौरवी करण करून सांगण्यात येऊ लागले तेंव्हा त्यांनी पुन्हा आपल्या आदिवासी समाजात परतले. 

ब्रिटिशांचा त्रास एक बाजूला होताच, दुसऱ्या बाजूला जमीनदार, सावकार, महाजन आणि जहागीरदार या लोकांनी देखील आदिवासींचे शोषण सुरू केले.  आदिवासी लोकांच्या शेतजमिनी देखील हे लोक त्यांच्याकडून कपटी पद्धतीने हस्तक्षेप करून घेऊ लागले. शिक्षणाची व नियमांची माहिती नसल्याने आदिवासी लोक फक्त शोषणाला बळी जात होते. या सर्वांचे नेतृत्व बिरसा यांनी केले. १८९४ मध्ये त्यांनी आदिवासी जमातीचे नेतृत्व करीत जमिनी आणि आपल्या हक्कांच्या विरोधात एका आंदोलनाचे नेतृत्व सरकार विरोधात केले. व याच कालखंडात त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधातही हल्लाबोल केला.

त्यांनी बऱ्याच ठिकाणी इंग्रजांच्या विरोधात महत्वाची भूमिका बजावली. त्या काळच्या ब्रिटिश सरकारने आदिवासींना भडकविण्याच्या बहाण्याने बिरसा मुंडावर ५०० रुपये बक्षीस जाहीर केले होते. त्यांनी ब्रिटिश सरकारच्या सामंती प्रणालीचा विरोध केला होता.  जानेवारी १९०० मध्ये डोंबरी नावाच्या गावात या आदिवासी लोकांचा आणि ब्रिटिश लोकांमध्ये एक युद्ध झाले ज्यामध्ये बऱ्याच स्त्रिया आणि लहान मुले देखील मारले गेले. ३ फेब्रुवारी १९०० मध्येच बिरसा यांना अटक झाली. आणि पुढे ९ जून १९०० मध्ये  रांची च्या जेलमध्येच बिरसा यांचा मृत्यू झाला.

बिरसा मुंडा हे आजही आदिवासी यांच्या लढ्याचे नेतृत्व करीत नसते तर त्यांना त्यांचा हक्क मिळविणारा नेता प्राप्त झाला नसता. आजही आदिवासी समाज इतका पुढारलेला नाही. आपल्या सोबत त्यांनाही स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र शिक्षण, योग्य रोजगार, समाजतील स्थान या सर्वांवर त्यांचा जो हक्क आहे त्या हक्कांना त्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी बिरसा यांनी सुरवात केली होती. त्याकाळी ब्रिटिश कालीन परिस्थिती होती, मात्र आजही आदिवासी समाज थोडा कुठेतरी मागे दिसतो.

बिरसा मुंडा यांच्या कार्याबद्दल आज जाणून घेतले तर त्यांचे मिशन कुठेतरी आजही चालले पाहिजे असे वाटते. त्यांना आजही बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिसा आणि पश्चिम बंगाल मध्ये देव म्हणून पुजले जाते. त्यांच्या विचारांना अमर उजाळा दिला जातो. आज त्यांच्या जयंतीनिमित्त थोडे लिहावेसे वाटले. त्यांच्या कार्याला सलाम. 

No comments:

Post a Comment

भारतीय तंत्रक्रांतीचे प्रणेते : राजीव गांधी

भारतीय तंत्रक्रांतीचे प्रणेते : राजीव गांधी डॉ. अलोक पवार भारतात जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची रचना तयार केली तेंव्हा वेळोवे...