Saturday, 11 December 2021

साहेब : मनातले मनापासून पंतप्रधान

 साहेब : मनातले मनापासून पंतप्रधान

अलोक पवार

काही वर्षांपासून राजकारण समजायला लागलं. राजकारणातले विविध पैलू समजायला लागले. या संपूर्ण धर्तीवर एक नाव मागच्या ८० वर्षांपासून राज्य करते आहे ते म्हणजे 'पवार' साहेबांचं. कधीतरी मी पवार आहे याचा मला अभिमान प्रचंड वाटतो. हा म्हणजे काही लोक उगाच फुशारकी मारायला आडनावाच्या मागे पाटील, देशमुख लावतात, असतील देखील ते, पण आमचे बस पवार यावर भागून जाते. 

हे नाव मोठं केलंय शरद पवार साहेबांनी. महाराष्ट्रात राजकारण करावे आणि ते जीवापाड जोपासावे हे मोठ्या प्रमाणावर जमले आहे फक्त साहेबांना. महाराष्ट्रात अगदी कमी वयाचा मंत्री ते मुख्यमंत्री, राज्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशी विविध पदे त्यांनी भूषविली आहेत. प्रत्येक पद सांभाळताना अभ्यास करणे हे त्यांनी सोडले नाही. अगदी छोटे छोटे बारकावे त्यांनी निरखून बघितले. इतकेच काय त्यांनी विरोधक म्हणून देखील आपली भूमिका अगदी चोखंदळपणे मांडली. आणि म्हणूनच त्यांनी ठाकरे सरकार हे अशा प्रकारे उभे केले ज्याचा कोणी स्वप्नातपण विचार केला नसेल. हे सर्व करीत असताना विरोधक नाही तर सत्येत असणाऱ्या सर्वांनी बंड पुकारले. पण काय फक्त शब्द न पाळणाऱ्या सत्ताधारी लोकांना साहेबांनी धडा शिकवला, आणि सगळे गणित जुळवून आणले. काँग्रेस - राष्ट्रवादी ही साथ होतीच पण नेहमी विरोधात बसलेल्या शिवसेनेला देखील मित्र म्हणून बसवले. आणि ही मैत्री इतकी घट्ट बसली की नव्या विरोधकांनी तीन चाकी रिक्षा, एक वर्षांचा खेळ इतकीच नाही अशी नानाविध नावे ठेवली गेली. मात्र याच राजकारणात कोणत्या वक्तव्याकडे लक्ष द्यायचे आणि कोणत्या वक्तव्याला भीक देखील घालायची नाही हे पवार साहेबांच्या राजकारणी महाविद्यालयात आता सर्वच शिकले आहेत. म्हणून कोरोनासारखे महासंकट असताना देखील अतिशय व्यवस्थित पणे सर्व परिस्थिती अगदी महाराष्ट्र राज्य हे आपले घर आहे याप्रमाणे या महाआघाडी सरकारने सांभाळली. 

दिल्लीचे तक्त्य हलवणारे हे आमचे पवार साहेब. कारण पवार साहेब हे पवार जरी असले तरी ते पॉवर म्हणून समोर येताना दिसते. पवार साहेबांचे पुढचे पाऊल काय असेल कसे असेल हे सांगणे महाकठीण. भविष्य काय असणार आहे हे लगेच कळत नाही पण निर्णय घेतला म्हणजे घेतला, यात महाराष्ट्रात सुरवात केली ती म्हणजे महिलांसाठी आरक्षण. महिला ३३% राजकारणात आल्या. त्याही राजकारण शिकल्या. फक्त चूल आणि मुलं एवढंच बघणाऱ्या स्त्रिया या राजकीय धुरेत सहभागी होवू लागल्या. राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी केंद्रात देखील हे महिला धोरण लागू केले. महाराष्ट्र एवढ्यावर थांबले नाही महाराष्ट्र हे पहिले असे राज्य बनले जिथे ५०% महिला आरक्षण सुरू केले आणि या घटनेचा मुखीया म्हणजे आमचे पवार साहेब.

मध्ये तोंडाचा कॅन्सर साहेबांना झाला, बऱ्याच लोकांना मनातून आनंद पण झाला. पण शाहरुख खान याचा एक प्रसिद्ध डायलॉग आहे ना, "पिश्चर अभि बाकी हे दोस्त...", या युक्तीप्रमाणे पवार एकदम ठणठणीत उभे राहिले.मध्ये वर्तमान पत्र किंवा बातम्यांमध्ये पवार साहेब हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले अशी बातमी झळकली. बऱ्याच महाराष्ट्र वासीय या बातमीने हळहळले. मात्र त्यांनतर सकाळी पेपर वाचतानाचा साहेबांचा फोटो बघून जिवंत जीव आला. पावसाच्या भाषणात त्यांनी बोलले की, "मी काय म्हातारा झालोय का? अजून भरपूर लढाया लढायच्या आहेत". हे वाक्य होते ८० वर्षांच्या तरुणाचे.

साहेब काय माहिती पण मागच्या काही वर्षात शरद पवार अगदी अंगात भिनल्यासारखे झाले. श्री शाहू महाविद्यालय, पर्वती, पुणे तर्फे शरद पवार यांच्या आयुष्यावर शोधनिबंध लिहिण्यासाठी स्पर्धा झाली. माझे दुर्दैव म्हणजे मला संदर्भ साहित्य विकत देखीक भेटले नाही. मात्र लढाई करणे हे त्यांच्याकडूनच शिकलो त्यामुळे शोधनिबंध छापून आल्यावर कांग्रेस पार्टी अध्यक्ष यांची पाठीवर शाबासकी मिळाली. घरात मोठी बहीण आणि बायको 'शरद पवार माझ्या शब्दांत' या निबंधात पुरस्कर्ते ठरल्या. तिथे मी निबंध पाठवून मला सहभागी प्रमाणपत्र मिळाल्यावर मला खरी ५०% महिला आरक्षणाची भूमिका उमगली. मध्ये सुप्रियाताई सुळे यांनी आयोजित केलेल्या योद्धा@८० ही शॉर्ट फिल्म स्पर्धा आयोजित केली होती. काहीतरी वेगळे करायचे म्हणून शरद पवार यांची स्त्री पुरुष समानता त्यांच्या घरातून कशी सुरवात झाली ते अगदी सुप्रियाताई यांच्या जन्माच्या आधीपासूनच बाप बुलंद कहाणी दाखवली. त्यात मी स्वतः शरद पवार झालो, बायकोला प्रतिभा ताई पवार बनवले. पहिल्यांदाच सगळे दाढीत तू हँडसम दिसतो हे काही नव्याने कळूनही मी पवारांवर शॉर्ट फिल्म बनवण्यासाठी दाढी काढली. या सर्वच ठिकाणी पवार अंगात भिनत होते. ते अजूनही समजणे कठीण.

आज पवारांचा ८१ वाढदिवस. साहेब चिरायू होवोत.


1 comment:

भारतीय तंत्रक्रांतीचे प्रणेते : राजीव गांधी

भारतीय तंत्रक्रांतीचे प्रणेते : राजीव गांधी डॉ. अलोक पवार भारतात जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची रचना तयार केली तेंव्हा वेळोवे...